नागपूर : अधिवेशन एकहाती गाजवल्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गाठले आहे. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील आहेत. नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय गाठले.
सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासह संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे दखील बैठकीला उपस्थित होते. दीड तास बंद दरवाज्याआड झालेल्या बैठकीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या मुद्यांवरून ही बैठक झाली आणि कोणत्या कारणासाठी सदर बैठक झाली, याबाबत माहिती गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मुनगंटीवार हे भाजपमधील बडे नेते असून त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा सत्ता बदल होण्याच्या चर्चा सुरु झाली आहे. त्यांनतर संघाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ” इस्लाम स्वीकारल्यामुळे ‘हा’ विक्रम मोडू शकलो ; पाकिस्तानी खेळाडूचं विधान
- ऑर्डरला उशीर झाल्याने महिलेचा फुड घेण्यास नकार ; डिलिव्हरी बॉयने केले असे काही, पहा व्हिडिओ
- सामनात अग्रलेख आला म्हणजे घाव वर्मी बसला, देवेंद्र फडणवीसांचा टोला
- वीज ग्राहकांना इशारा; वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कापणार
- शुभकार्य कधी ना कधी होणारच… ठाकरे सरकार तीन महिन्यात पडणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
