मुंबई: वीज कनेक्शन तोडण्याबाबत स्थगिती देण्यात आली होती. परंतु हि स्थगिती आता मागे घेण्यात आली आहे. नुकतेच अधिवेशन संपले असताना राज्यातील वीज ग्राहकांना हा मोठा झटका बसला आहे त्यामुळे वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचं वीज कनेक्शन आता कापलं जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्च २०२१ रोजी विधानसभेत चर्चा झाली होती. यात महावितरणाव्दारे वीज ग्राहकांची जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या आधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास स्थगितीचे आश्वासन दिले आहे.
लॉकडाऊन दरम्यान सामन्यांना आर्थिक अडचणी आल्या असताना त्यात भरमसाट वीज बिलामुळे लोकांच्या अडचणीत अधिकच वाध झाली. लोकांना सरासरीवर आधारीत वीज देयके देण्यात आली होती. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात बिलं आल्याने राज्यातील जनतेने आक्रोश व्यक्त केला होता. मध्यंतरी वीज बिलमध्ये सवलत बाबत घोषणा करुन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी युटर्न घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा वीज कनेक्शन तोडल जाणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- इंधन दरवाढीचा अनोखा निषेध, वकिल महिला घोड्यावर बसून न्यायालयात दाखल
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

