🕒 1 min read
Devendra Fadnavis | मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकही अपक्ष आमदाराचे नाव नाही. तर या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. तसेच मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या नावांचा समावेश मंत्रिमंडळात आहे. या मुद्यांवरून विरोधकांकडून आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार टीका सुरु आहेत. मात्र विरोधकांच्या टीकांना आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ज्यांचे नेते सध्या जेलमध्ये असतील. तसेच ज्यांच्या अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील अशा पक्षाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी अगोदर आरसा पाहावा, असे फडणवीस म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांवरील आरोपांची ग्राफिक्स ट्विटरवर ट्विट केली आहेत. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले कि, ज्या पक्षाचे दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील अशा पक्षाने यादी टाकण्याचा नैतिक अधिकार आहे का? त्यांनी अगोदर आरसा पाहावा आणि नंतर अशा प्रकारचे ट्वीट करावे, असा टोला लगावला. तसेच संजय राठोड यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Patil | “आता संजय राठोडांना चित्राताई राखी बांधायला जाणार”- रुपाली पाटील यांचा खोचक टोला
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अजूनही विधान परिषदेवर! आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, काय आहे कारण ?
- Kishori Pednekar | मंत्रिपदाची शपथ घेताना एकाही मंत्र्याने बाळासाहेबांचे नाव घेतले नाही; किशोरी पेडणेकर आक्रमक
- Nana Patole | हे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातसाठी – नाना पटोले
- Rupali Patil | “…त्यांनाच मंत्रिपदं देताना लाज वाटली नाही का?”; रुपाली पाटील संतापल्या


