औरंगाबाद : महापालिकेतून अनेक अनुभवी अधिकारी सध्या सेवानिवृत्त झाले आहेत अनेक सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्याचा परिणाम कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय कामकाजावर होत आहे. यातच शुक्रवारी (दि.३०) आणखी तीन तज्ज्ञ अधिकारी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व उपअभियंता बी.डी. घुले हे सेवानिवृत्त झाले. तसेच फारोळा येथे इलेक्ट्रीशियनची जबाबदारी सांभाळणारे आनंदा मल्हारे देखील शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. यामुळे लवकरात लवकर औरंगाबाद मनपात कुशल अधिकारी वर्गाची भरती होणे आवश्यक आहे.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयुक्तांनी आपले विचार मांडतांना सांगितले, कोणत्याही खात्यात प्रदीर्घ काळ नोकरी करत असतांना कर्तव्यनिष्ठ आणि परिश्रम पूर्वक चांगले काम करून आपले आयुष्य घातले, अशा अधिकाऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या सहकाऱ्यांना व इतरांनाही करून द्यावा , असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील तज्ज्ञ अधिकारी म्हणून या अधिकाऱ्यांची ओळख आहे. वर्षभरापूर्वीच कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती मिळालेले हेमंत कोल्हे यांनी पालिकेत ३८ वर्षे सेवा दिली. १५ मार्च १९८३ साली ते पालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात २२ वर्षे सेवा दिली.
दुसरीकडे बी.डी. घुले यांनी पालिकेत २७ वर्ष सेवा देतांना जायकवाडी, फारोळा व नक्षत्रवाडी येथील वीजपुरवठा सुरळीत ठेवताना यांत्रिकी विभागाची जबाबदारी पार पाडली. या दोन अधिकार्यांबरोबरच पाणीपुरवठा विभागात फारोळा येथे इलेक्ट्रीशिनची जबाबदारी सांभाळणारे आनंदा मल्हारे देखील शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. या तीन अधिकार्यांच्या निवृत्तीमुळे तज्ज्ञ अधिकार्यांची कमतरता आता पालिकेला भासणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कामगार दिनी मनपा कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम! अजून किती दिवस अन्याय सहन करायचा?
- ऑनलाईन ई-पास मिळत नसल्याने नागरिक त्रस्त
- नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल; चाकूर आढावा बैठकीत तहसीलदारांचा इशारा
- पहिला व दुसरा डोस घेतलेल्या पैकी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही : पालकमंत्री
- औरंगाबादेत १८ प्लस लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा तर झाला, मात्र पुढे….काय?


