लातूर: कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र अजूनही कोरोनाचे संकट गेले नाहीये, त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन येथील स्थानिक प्रशासन करत आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव होत असल्याने ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी दिला. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत ते बोलत होते. गृहविलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगिकरण करण्यावर भर द्या, यासाठी ग्रामपंचायतीने उर्दू शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करावा. यामुळे गृहविलगीकरणात असतानाही बाहेर फिरणाऱ्या लोकांमुळे वाढत असलेला कोरोना रोगाचा प्रसार टाळता येईल, असेही यावेळी बिडवे म्हणाले.
गावातील १८ ते ४५ वर्षे व ४५ वर्षांवरील नागरिकांची यादी करून त्यात लस घेतलेले व न घेतलेले अशा याद्या कराव्यात. यामुळे लसीकरणावेळी मदत होईल. ग्रामपंचायत कार्यालयाने पोलीस विभागाच्या मदतीने जे दुकानदार / व्यापारी ठरवून दिलेल्या निर्बंधांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. जे वारंवार नियम मोडत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असा इशारा या वेळी तहसीलदार बिडवे यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पाणी डोक्यावरून गेलेय, तत्काळ ऑक्सिजन द्या’, हायकोर्टाने मोदी सरकारला झापले
- औरंगाबादेत १८ प्लस लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा तर झाला, मात्र पुढे….काय?
- हसनखेडा भागात शेतात मृतावस्थेत आढळला बिबट बछडा
- नांदेडचे प्रशासन लागले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठीच्या कामाला
- कोविड रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावा, ग्राहक पंचायतची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

