अहमदनगर : देशात कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण बाधित होत असून, या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोपरगांव येथे केले.
कोपरगाव तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, कोविड केअर सेंटरची पाहणी तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णाई मंगल कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असून, पहिल्या आणि आताच्या लाटेतील रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत आहे. कोरोना हे मानवजातीवर आलेले संकट असून तो रोखण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून करावे. केंद्र शासनाने रेमडेसिविर औषध निर्यात करण्यास बंदी घातली असल्याने या औषधाचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल चोवीस तासात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडण्याचे आणि कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त येईपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सांगितले. आमदार आशुतोष काळे यांनी कोविड रुग्णांसाठी ॲम्बुलन्स तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. कोविड रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा नाशिक जिल्ह्यातून पुरवठा करावा, कोविड केअर सेंटरला ऑक्सिजनची जोडणी तातडीने करण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा नागरिकांनी स्वयंशिस्तीने अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच कोविडबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याचे आणि चाचणी अहवालाचा कालावधी कमी केल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- कुंभमेळ्यातून परतणारे आता कोरोनाचा प्रसाद वाटत फिरतील ; महापौर पेडणेकरांचा टोला
- ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतोय, सोळा दिवसात वाढले तब्बल ‘इतके’ रुग्ण!
- धक्कादायक : अवघ्या १५ दिवसात कोरोनाने अख्खं कुटुंब केले उद्ध्वस्त
- बीड जिल्ह्यात काळाबाजारी चव्हाट्यावर; रेमडेसिविरचे दोन इंजेक्शन दहा हजार ८०० रुपयांमध्ये विकले
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले : पियुष गोयल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
