बुलढाणा : मराठा समाजाचे आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण यासंदर्भात गेल्या पन्नास वर्षांपासून सत्तेत असलेले प्रस्थापित मराठा नेते आणि महाविकास आघाडी सरकारवर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार घणाघात केलाय ते बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजातील बहुसंख्य विस्थापित असलेल्या समूहाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे, मात्र प्रस्थापित मराठ्यांना विस्थापित मराठा बांधवांना आरक्षण द्यायचेच नाही, कारण हे आरक्षण दिल्यास प्रस्थापित मराठा नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते या भीतीपोटी ते आरक्षण देण्यासाठी उदासीनता दाखवत आहेत, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
तर ओबीसी समाजाची जनगणना करून ओबीसी समाज बांधवांचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवणे अत्यंत गरजेचे होते मात्र तेही या महाविकास आघाडी सरकारने केलेले नाही, असे जोरदार ताशेरे देखील यावेळी सदाभाऊ खोत यांनी ओढले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चोरांनी लुटलेली ‘ती’ रक्कम पोलिसांकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला परत
- ‘सुप्रिया सुळेंना आणीबाणीचं काय माहितीये ?’; फडणवीसांचा पलटवार
- ओबीसी आरक्षण : आंदोलनाला प्रत्युत्तर आंदोलन कसे असू शकते ?
- ‘कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकणे मोठा गुन्हा ठरेल’
- पैठणमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट तांदूळ! प्रशासनाकडे नागरिकांच्या तक्रारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

