पुणे : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पेटलेला आहे. शिवसेनेकडून दररोज राणे यांच्या शाब्दिक बाण सोडले जात आहेत. तर राणेही त्यांच्यावर प्रहार करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण सध्या चांगलेच गरम आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे तर राणे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. पण आता महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही राणेंना लक्ष्य केलेय.
पुणे जिल्ह्यातील आळे ग्रामपंचायतीचं आणि शिवसेना शाखेचं उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले. ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपमध्ये फक्त बोलण्यासाठी आहे. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्चा फक्त चार आण्याची करतात, अशी खोचक टीका सत्तार यांनी याप्रसंगी केली.
तसेच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आणि राणे कुठे? बाळासाहेब ठाकरेंनी नाऱ्यापासून त्यांना नारायण राणेंपर्यंत पोहोचवलं. त्याचं भान त्यांनी ठेवले पाहिजे. पण ते विसरले, असा टोलाही सत्तार यांनी लगावला. भाजपा आमच्या सोबत होता तोपर्यंत ते आंब्याच्या झाडाखाली बसले होते. पण आता राणेंच्या समावेशामुळे ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत. याचे भान भाजपने ठेवले पाहिजे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
तर पुण्यातील हंडेवाडी येथे बोलताना सत्तार म्हणाले, नारायण राणे यांनी आपल्या पदाला शोभेल असे बालावे, मोजके बोलावे. राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा शिवसेना त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल. राणेंनी तोंडावर ताबा ठेवला नाही, तर ईट का जवाब पत्थर से कसा दिला जातो, हे शिवसेनेला शिकवायची गरज नाही, असा निर्वाणीचा इशाराही सत्तार यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात – सावंत
- ‘राणे गेल्यापासून भाजप दहा फूट मागे, एक दिवस असा येईल की..’, राऊतांचा इशारा
- ‘निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा चोख उत्तर दिले जाईल’, सल्लागाराच्या राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक
- ‘काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती तेव्हा…’ शेलारांची शिवसेनेवर टीका
- ‘अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या पण काही जणांनी येड्यांच्या जत्रा केल्या,’ संजय राऊतांचा घणाघात


