🕒 1 min read
सोलापूर : केवळ घाम पुसण्यासाठी मास्क खाली घेतला तरी दंडाची पावती आकारत असल्याचा प्रकार सोलापूर येथे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.दुकानात एकटा असला तरी मास्क आवश्यक आहे का? व्यापार करायचा की दंड भरत बसायचे? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे. यंत्रणेने दुकानात घुसून कारवाई सुरू केल्याचा निषेध करण्यासाठी दुपारी दुकाने बंद केली. दरम्यान, होत असलेली कारवाई नियमानुसारच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोलापूर शहरातील चाटी गल्ली येथे पोलिसांच्या पथकाने अचानक कारवाई सुरू केली. नियमांचे उल्लंघन केले म्हणून पाचशे ते दोन हजार रुपये दंडाच्या पावत्या फाडू लागले. त्याला विरोध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने बंद केली. पाहता पाहता टेलिफोन भवनपासून कुंभार वेसपर्यंत सर्व दुकाने दुतर्फा बंद झाली. त्यानंतर एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी माध्यमांसमोर गाऱ्हाणे मांडले. आधीच कोरोनामुळे व्यापारपेठेत मंदी आहे. त्याचा सामना करत व्यापारी दुकाने उघडत आहेत.
दुपारच्या वेळी ग्राहक फिरकतदेखील नाहीत. अशा वेळी काही जण दुकानात थेट येतात. मास्क खाली आल्याचा फोटो काढतात. दंड भरण्यास सांगतात. व्यापार नसताना दोन हजार रुपयांचा दंड आणणार कोठून? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी विचारला आहे. कोरोनाला रोखणारे सर्व उपाय करून नियम पाळत आहेत. परंतु यंत्रणा ‘टारगेट’ पूर्ण करण्यासाठी व्यापारपेठेतच चकरा मारत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. साधे पाणीही प्यायचे नाही का? हा कसला जुलूम आहे? अशा शब्दांत त्यांनी गाऱ्हाणी मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
- कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू
- आरोपीसोबत मद्यपार्टी भोवली; सहायक उपनिरीक्षकासह दोघे निलंबित
- २० वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार?
- ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
