मुंबई : मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. यावेळी ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी ७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
यावर आता भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज लॉकडाऊन संदर्भात केलेल्या एका वक्तव्याची बातमी जोडत ते म्हणाले कि, ‘लॉकडाऊन लावण्याशिवाय तुम्हाला येतं तरी काय खंडणी गोळा करता येते म्हणा.’ असा खरमरीत टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान आज मुख्यमंत्री ठाकरे बोलताना म्हणाले कि, ‘अजूनही करोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचे आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, कोरोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल.’ असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्टंटबाजी कशाला करताय? आम्हालाही बैलगाडा शर्यत सुरूच करायचीये’, अजित पवारांनी सुनावले
- पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली
- ‘जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय’, रावसाहेब दानवेंवर पलटवार
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रच लढवूयात!’, सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

