🕒 1 min read
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (७ फेब्रुवारी) संसदेत भाषण करताना कोरोना काळात महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनची फुकट तिकीटे देऊन कामगारांना पाठविण्यात आले आणि परिणामी पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये कोरोना वाढला,असे म्हटले. यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे, (Supriya Sule) नाना पटोले, बाळासाहेब थोरात, (Balasaheb Thorat)अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कितीही दिशाभूल केली, तरी मोदीजी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं असून मोदींचं एवढंच म्हणणं आहे की, कोरोना काळात आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकून तुम्ही तुमच्या गावाला जा असं सांगण्याचा जो प्रयत्न झाला, त्यामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच बाळासाहेब थोरात तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना ठाऊकच आहे. प्रत्यक्ष भाजप कार्यकर्ते यांनी कार्य केले आहे. लॉकडाऊन मध्ये झालेलं आर्थिक नुकसान मोदींनी भरून काढलं. त्यामुळे केंद्राने जरी रेल्वे सोडल्या असल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तसेच तुम्हाला चांगल्याचे कौतुक करता येत नाही त्यामुळे मोदींकडून काही शिका, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कर्नाटकातील हिजाबचे पडसाद महाराष्ट्रातही
- या राज्यात सर्व कॉँग्रेस आमदारांचे बंड; घेतला मोठा निर्णय
- ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल’; चंद्रकांत पाटलांचा टोला
- किरीट सोमय्या यांचे आम्ही पुणे महानगरपालिकेत जंगी स्वागत करणार, भाजप पधाधिकाऱ्याची घोषणा…
- “शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून…”; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ टीकेला विखे पाटलांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
