अहमदनगर: चार दिवसांपूर्वी संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सत्रात अनेक दिग्गज नेत्यांनी आपली मते मांडली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपले मत मांडले. त्यात त्यांनी ‘खाल्ल्या मिठला जागावे’ अशी मराठीत म्हण म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटील जागले नाहीत, असा टोला लगावला होता.
सुजय विखे आणि सुप्रिया सुळे दोघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. सुप्रिया सुळे यांनी सुजत विखे पाटील खाल्ल्या मिठाला जागले नाहीत, ते त्यांचा इतिहास विसरले असे त्यांना सुनावले होते.
याच व्यक्तव्याला उत्तर देत आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुनी एक गोष्ट सांगत सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला. त्यांनी म्हटले, “ज्या राजीव गांधींनी शरद पवार यांना कॉँग्रेस मध्ये घेतले, त्याच शरद पवारांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले, त्यांनी कॉँग्रेसच्या आणि राजीव गांधींच्या पाठीत खंजीर खुपसत आपला स्वतंत्र पक्ष तयार केला, हे सुप्रिया सुळे विसारल्या का?”
“शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद दिले होते. त्यांनी १० जून १९९९ साली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष स्थापन करून कॉँग्रेसला राम राम ठोकला होता”, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला.
महत्वाच्या बातम्या:
- गोव्याच्या स्वातंत्र्यावरून मोदींचा पुन्हा नेहरूंवर निशाणा
- वेस्टइंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याकरता या चार खेळाडूंचे पुनरागमन
- “ विराटची मनःस्थिती सध्या ठीक नाहीये ” ; आकाश चोप्राचा दावा
- ‘मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंनी हैराण होऊ नये’; नवनीत राणा यांचा सल्ला
- कर्नाटकातील शाळेत तिरंगा काढून भगवा फडकवला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

