पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. पुण्यात दुसरा डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. याविषयी बोलताना अजित पवारांनी रोखठोक भाष्य करत पुणेकर नियम पाळत नसल्याचं स्पष्ट म्हंटल आहे. नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, फिजीकल डिस्टन्सिंगचं पालनं केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
गेल्या आठवड्यात ५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणामध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. लसीकरणानंतर किती जणांना कोरोनाची बाधा होते यासाठीचे एक सर्वेक्षण पुण्यात झाले असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यामध्ये ०.१९ टक्के इतक्यांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले आहे. तर दुसरा डोस घेतल्यानंतर ०.२५ टक्के इतक्या जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिक नियम पाळत नाहीत. म्हणूनच दुसऱ्या डोसनंतरही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिकांकडून मास्क न वापरणे, कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करणे यामुळेच कोरोनाची लागण होत असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. त्यामुळे लस घेतली म्हणजे कोरोनाचे नियम पाळायचे नाहीत ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

