Share

तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मागील अनेक महिन्यांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आदोलन सुरू आहे. दरम्यान, दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी ‘किसान महापंचायतीने’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण, यावरुन न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारल्याच पाहायला मिळालं आहे.

तुमचा न्यायालयावर विश्वास असेल तर विश्वास ठेवा. आंदोलनाची काय गरज आहे? एकीकडे तुम्ही संपूर्ण शहराचा गळा दाबला आहे आणि आता तुम्हाला शहराच्या आत (जंतर-मंतर) यायचं आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत म्हंटल आहे.  सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला याचिकेची एक प्रत केंद्रीय एजन्सी आणि अ‌ॅटर्नी जनरल कार्यालयाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, किसान महापंचायत रास्ता रोको करण्यात सहभागी नाही, असे प्रतिज्ञापत्रदेखील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

तुम्हाला निषेध करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही मालमत्तेला नुकसान पोहचू शकत नाहीत. तुम्ही डिफेंसच्या लोकांनाही त्रास देत आहात, हे थांबयला हवं, सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला सांगितले आहे.  युक्तीवादादरम्यान, किसान महापंचायतीकडून महामार्ग आमच्याकडून अडवण्यात आला नसल्याचा, पुनरुच्चार करण्यात आला . सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!