Share

दोनशे रुपये वसूल करूनही लोक ऐकत नाहीत, अखेर या शहरासाठी गृहमंत्र्यांनी घेतलाहा निर्णय  

Published On: 

🕒 1 min read

नागपूर:-कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आवश्यक आहे. परंतु यानंतरही अनेक जण मास्क परिधान करीत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न घातल्यास पूर्वी २00 रुपये दंड वसूलण्यात येत होता. परंतु आता सोमवार १४ सप्टेंबरपासून या दंडामध्ये वाढ करून तो ५00 रुपये करण्यात आला असून, याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. विभागीय आयुक्तालयात कोरोनासंदर्भातील आढावा बैठक घेतल्यानंतर देशमुख हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हजारो नागरिक शहरात विनामास्कने फिरत आहेत. त्यांच्याविरुद्ध गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

आता कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. याशिवाय सर्व प्रशासनाने एकत्र येत वाढत असलेला कोरोना बाधितांचा आकडा कमी करीत, मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना केल्या आहेत. मोठय़ा प्रमाणात पोलिसही बाधित होत आहेत. ३७५ वर पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांना देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या उपचाराची कशी सोय करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!