औरंगाबाद : पोलीस ठाणे पैठणसह एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या शेतवस्ती वरील शेतक-यांच्या सुरक्षेसाठी शेतवस्ती सुरक्षा दलाची स्थापना उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांच्या उपस्थितीत कातपूर परिसरातील वस्तीवर शेतवस्ती सुरक्षा दलाची स्थापना केली.
युवकांना लाठी, टी-शर्ट, शिट्टी यांचे वाटप करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आयपीएस गोरख भामरे यांनी यावेळी केले. यावेळी पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सपोनि अर्चना पाटील यांनी दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या परिसरातील अनेक शेत वस्त्यासाठी उपाययोजना म्हणून शेतवस्ती सुरक्षा दलाची स्थापना केली.
यावेळी आयपीएस गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि अर्चना पाटील, प्रा.देविचंद मोरे, विठ्ठल दोरखे, भास्कर मोरे, योगेश मोरे, हरीभाऊ रोडी, अशोक गोगडे, गणेश बर्डे, किरण डांगे आदी उपस्थीत होते.
महत्वाच्या बातम्या
- हटके अंदाजात सेहवागने धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

