लातूर: निसर्ग ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे, निसर्गाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल तर राखला जाईलच पण शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा वाढेल” असे प्रतिपादन यावेळी व्यक्त केले. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आ. अभिमन्यू पवार यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत आज तळणी, उजनी, गुळखेडा व बोरफळ या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. “आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. मतदारसंघातील प्रत्येक बंधार्यावर, गायराण/गावरान/पडीक जमीनीवर मनरेगा योजना व बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. निसर्ग ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे, निसर्गाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल तर राखला जाईलच पण शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा वाढेल” असे प्रतिपादन यावेळी व्यक्त केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, रोहयो एपीओ, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

