गुवाहाटी : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क बांधले जात होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार त्यांचे विचार आणि भूमिका घेऊन आम्ही समाजकारण आणि राजकारण करणार असल्याच एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार का या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.