🕒 1 min read
औरंगाबाद : गत वर्षीपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध आहेत. साधेपणाने आपण हा उत्सव साजरा करत आहोत. मात्र संपूर्ण कोरोना काळात पोलिसांनी अतिशय संयमाने लढा दिला. अजूनही आमची जबाबदारी संपलेली नाही. पीएसआय पूनम पाटील यांनी महाराष्ट्र देशाच्या गणेशोत्सवात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
‘महाराष्ट्र देशा’ने गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरतीचा उपक्रम राबवला. यावेळी जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पीएसआय पूनम पाटील यांनी आरतीनंतर कोरोना काळातील आपले अनुभव मांडले. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, महाराष्ट्र देशाचे सर्व प्रथम मी आभार व्यक्त करते. त्यांनी विविध क्षेत्रातील महिलांना आरतीचा बहुमान दिला. २०२० मध्ये आपण सर्वांनी अतिशय वाईट काळ पाहिला. कोरोनाने अनेकांना भयंकर अनुभव दिले.
मात्र सामान्य नागरिक घरातच राहावा आणि सुरक्षित राहावा यासाठी पोलीस ऑन फील्ड कार्यरत होते. लोकांना घरातच थांबवून ठेवणे हे आमचे पहिले कर्तव्य होते. आता जरी परिस्थीती सुधरत असली तरी नियम पाळणे तितकेच गरजेचे आहे. त्याबरोबरच गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांनी सुरक्षित राहा आणि अनोळखी लोकांपासून सतर्क राहा. यावेळी अतुल पाटील यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- ‘राज्यात लावलेली आणीबाणी अधिकृतपणे घोषित करून टाका’, चंद्रकांत पाटील ठाकरे सरकारवर संतापले
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- मुख्यमंत्रीजी, महिला-मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही – चित्रा वाघ
- अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
