Share

‘बंद’मुळे मराठवाड्यातील अठराशे कोटींची उलाढाल ठप्प

Published On: 

औरंगाबाद : शुक्रवारी, दि. २६ फेब्रुवारी रोजी ‘जीएसटी’ कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात व्यापाऱ्यांनी औरंगाबादसह मराठवाड्यात बंद पुकारला होता.  बंदला किरकोळ दुकानदार वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा व्यापाऱ्यांच्या संघटनेने केला आहे. मात्र, या आंदोलनामुळे औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास ४०० कोटी तर मराठवाड्यातील १८०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते अशी माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने ‘जीएसटी’च्या माध्यमातून ‘इन्स्पेक्टर राज’ निर्माण केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. जीएसटी रिटर्न भरण्यात कधी काही क्षुल्लक चूक झाली किंवा संगणकाच्या माध्यमातून आकडे कमी-अधिक झाले तर दुरुस्त करण्याची मुळीच संधी नाही. अशा छोट्या-छोट्या चुकांसाठीही आमचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते आणि पाच-पाच पिढ्यांपासूनच्या व्यवसायावर संक्रांत येते. मालमत्ता सील केल्या जातात आणि त्यात पुन्हा अधिकाऱ्यांना वाटेल, तसे अधिकार देण्यात आले आहेत.

जीएसटी कायद्याचे नियम कडक आहेतच; शिवाय दंड कठोर आहेत व दंडाचे व्याजदरही १८ ते २४ टक्क्यांपर्यंत आहेत. एखाद्या गुन्हेगारालाही त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते; पण तशी संधी आम्हाला नाही. त्यामुळेच हे ‘इन्स्पेक्टर राज’ आहे, अशी टीका व्यापाऱ्यांनी केली आहे. ‘बंद’मुळे मराठवाड्यातील १८०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होते, असे मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!