🕒 1 min read
जळगाव: शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु असून लगातार ते एकमेकांवर वार करत आहे. काल (२० फेब्रुवारी) गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना चारी मुंड्या चीत नाही केल्या,तर पाटील नाव लावणार नाही. असे म्हटले होते. यावरच आता खडसे (Eknath Khadse) यांनी गुलाबराव (Gulabrao Patil) तुम्ही नाव लावूच नका. तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब आहेत, अशी टीका केली आहे.
जिल्ह्यातील विकास कामावरून बोलताना बाळ कुणाचे, बारसे कुणाचे, मात्र डफडं ते वाजवत असल्याचे खडसेंनी म्हटले आहे. तसेच आपले थोबाड खराब करू नका. माझे नाव एकनाथ हे संतांचे नाव आहे. त्यामुळे तोंडाला लावू नका. असा इशाराही खडसेंनी दिला आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले होते?
“काही लोक माझ्याबद्दल नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. कडाला कड लावून बोलवं, चारीमुंड्या चीत करूनचं हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही”, असे थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच त्यांना जे जमलं नाही ते मी जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात ही गद्दारांना जागा नव्हती. असेही त्यांनी म्हटले होते.
दरम्यान दुसरीकडे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्याने राजकारणात अनेक चर्चना उधान आले आहे. गेल्या काही दिवसापासून गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय युद्ध सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेची ठरते आहे.
महत्वाच्या बातम्या:
- दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक दावा; म्हणाले,”सचिन वाझेंच्या मर्सिडीजमधून…”
- आणि तेजस्वी यादव यांना आठवले अजित पवार
- नागपूरमध्ये भाजप नगरसेवकांचे धाबे दणाणले
- राजकारण करताना सभ्य भाषेचा वापर करावा ; जयंत पाटील यांचा सर्वांनाच सबुरीचा सल्ला म्हणाले …
- लोकल प्रवासाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी ; म्हणाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
