औरंगाबाद : पैठण तालुक्यात विज वितरण कंपनीतर्फे विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करने व सक्तीची विज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. विज वितरण कंपनीने ही कार्यवाही तात्काळ थांबवावी व विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महावितरणकडून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्यात येत असून सक्तीने विज बिल वसुली करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी अनुदान हेक्टरी १० हजार रुपये जाहीर करुन प्रत्यक्षात ४ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे अतिवृष्टी व वेगवेगळ्या संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासन व विज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करुन शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय करत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.
विज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून यामुळे शेतातील उभ्या पिकांना जगविणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विज वितरण कंपनीने कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्याची मोहीम तातडीने थांबवून शासनाने जाहीर केलेले अतिवृष्टीचे अनुदान देऊन शेतकऱ्यांवरील संकटाचे निवारण करावे. नसता शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राज्याचे चिटणीस मंडळ सदस्य डॉ. उमाकांत राठोड,तालुका चिटणीस चंद्रशेखर सरोदे, अल्पसंख्याक चिटणीस अन्सर शेख आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- फ्लॉप अजिंक्य रहाणे सोशल मिडीयावर जोरदार ट्रोल
- ‘मविआ सरकार पूर्ण पाच वर्ष सत्तेत काम करेल आणि पुन्हा…’; भुजबळांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
- अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले…
- दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ‘हा’ खेळाडू घेणार हार्दिक पांड्याची जागा!
- कानपूर कसोटीत चेतेश्वर पुजाराच्या नावावर लज्जास्पद विक्रमाची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

