नाशिक – नाशकात उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन खासदार हेमंत गोडसे अडचणीत आले आहेत. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला निमंत्रित न केल्याने शिवसेनेतील अनेक जेष्ठ पदाधिकारी नाराज आहेत. हे नाराज पदाधिकारी थेट उद्धव ठाकरेंकडे याबाबतची तक्रार करणार आहेत. शिवसेनेसोबतच आघाडीचे अनेक नेते देखील गोडसेंवर नाराज झाले आहेत. भुजबळांनी नाराजी व्यक्त जाहीर केल्याने नाशिकमध्ये आघाडीत दुरावा वाढला आहे.
हेमंत गोडसे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याला न बोलवता स्वत:च उड्डाणपुलाचं उद्घाटन करुन टाकलं. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी वाट न पाहता उद्घाटन करुन टाकलं. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी बोलताना या उड्डाणपुलाचं अधिकृतरित्या उद्घाटन नितीन गडकरी ऑनलाईन पद्धतीने करणार असल्याचं सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत. लोकांच्या सुविधेसाठी उद्घाटन केलं, असं देखील गोडसे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे या पुलाची उभारणी नुकतीच पूर्ण झाली. फित कापून उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतुकीसाठी उड्डाणपुल खुला केल्यामुळे शहरवासियांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असं देखील हेमंत गोडसे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाच्या ‘त्या’ याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध
- ९ ऑगस्ट ठरला ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट दिवस
- नीरज चोप्राने बायोपिकसाठी दिली ‘या’ दोन अभिनेत्यांना पसंती
- दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव शिवाय टीम इंडिया लॉर्ड्सवर रवाना
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध शकिब अस हसनने ओलांडला मैलाचा टप्पा, अशी कामगीरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

