Share

महाविकास आघाडीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस; जगतापांचा स्वबळाचा नारा तर गायकवाड म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी काल अखेर अनुभवी नेते व विधान परिषद सदस्य भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आवाहन असणार आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप म्हणाले आहे.

राज्यात आम्ही सत्तेत एकत्र आहोत त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढलो तर हरकत काय, असं मत मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. तसेच महाविकास आघाडीने आम्हाला योग्य तो सन्मान द्यावा अशी मागणीही एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.

दरम्यान, युतीबाबत आमचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. सद्याची युती ही फक्त महाराष्ट्रातील सरकार चालवण्यासाठीची आहे. यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा आधार घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी सगळ्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस स्वबळावर लढली पाहिजे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे, असं मत काँग्रेस नेते नसीम खान यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!