Share

थायलंडसह इतर बौद्ध केंद्रांना औरंगाबादवरुन थेट विमान प्रवास- खासदार इम्तियाज जलील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातून पर्यटनाला जाणाऱ्या आणि पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. नागरी विमान वाहतूक समितीच्या दिल्ली मध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंधिया यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, ‘पर्यटन क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी थायलंड आणि भारतातील इतर बौद्ध केंद्रांसह औरंगाबादची आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटी असण्याची मागणी विचारात घेण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार. द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये अधिक हवाई जोडणीचा मुद्दा दिल्लीत नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत उपस्थित केला.’

औरंगाबाद हे राज्याची पर्यटन राजधारी असली तरी योग्य सुविधा नसल्याने पर्यटक पाठ फिरवतात. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणी पाहण्यासाठी विदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यांना हवाई कनेक्टिव्हिटी चांगली मिळाल्यास पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!