🕒 1 min read
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने यंदाच्या हंगामात आपल्या संघाच्या आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यतेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल २०२२मध्ये बंगळुरू संघ फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मागील हंगामात विराट कोहलीने संघाचे नेतृत्व सोडले. आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही.
यंदा आरसीबीकडे असे काही खेळाडू आहेत जे संघाला ट्रॉफी मिळवून देऊ शकतात. या संघाने आतापर्यंत पाचपैकी तीन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. आरसीबी सहा गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी कार्तिकला विचारण्यात आले होते, की यावेळी आरसीबी आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना हसत तो म्हणाला, “मी सांगू शकत नाही पण संघातील वातावरण चांगले आहे. मला वाटते की आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बंगळुरूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. चेन्नईने २० षटकांत ४ बाद २१६ धावा केल्या होत्या. शिवम दुबेने नाबाद ९५ आणि रॉबिन उथप्पाने ८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ९ बाद १९३ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- राज ठाकरे यांच्या शरद पवार नास्तिक असल्याच्या आरोपावर पवारांचे प्रत्युत्तर
- IPL 2022 MI vs PBKS : रोहित शर्मानं जिंकला टॉस; मुंबई इंडियन्स संघात एक बदल!
- गव्हाच्या पेरणीतून साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 31 हजार स्क्वेअर फुटांचे पोट्रेट
- “राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज”- जयंत पाटील
- नवनीत राणांना मिळणार वाय प्लस सुरक्षा, VVIP श्रेणीत समावेश
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
