मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यावरुन सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी तिच्या वक्तव्यामुळे तिला मूर्ख म्हणत तिच्या वक्तव्याला आणि तिला महत्व देणं चुक असल्याचंही म्हंटल आणि दुर्लक्ष केलं. त्यावरुन राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कंगनावर टीका केली आहे.
कंगनाने केलेल्या बेताल वक्तव्याला मूर्खपणा म्हणून दुर्लक्ष करु शकत नाही, कारण कंगना ज्या विषयांवर बोलली ते आपल्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी स्वातंत्र्याला भीक म्हणून सांगितलं. आधी कंगनाने स्वातंत्र्याला भीक म्हंटलं, क्रांतीकारकांचा अपमान केला आणि आता महात्मा गांधींवर टीका केली. यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला आहे का?, असा सवाल नितीन राऊतांनी यावेळी विचारला आहे.
दरम्यान, कंगना रणौतने 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य नसून ती भीक आहे. खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं आहे. त्याचबरोबर ‘हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते,आपले हिरो हुशारीने निवडा’, असंही कंगना म्हणाली आहे.
कंगना के बेतुके बयान को आप उसे पागल कहकर नजरअंदाज नहीं कर सकते। क्योंकि वह जिन विषयों पर बोल रही है वो हमारी राष्ट्रीय अस्मिता से जुड़ा है।
पहले आजादी को भीख बताया। क्रांतिकारियों का अपमान किया। अब महात्मा गांधी जी पर टिप्पणी की। क्या उसे इसीलिए पद्मश्री मिला है?
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) November 17, 2021
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा संपात फूट पाडण्याचा प्रयत्न; गोपीचंद पडळकरांचा आरोप
- शरद पवार आणि अनिल परब कान उघडून ऐका…; गुणरत्न सदावर्ते आक्रमक
- ‘कंगना जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा’; गोखलेंसोबत काम न करण्याचा निर्मात्याचा निर्णय
- कंगनाच्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’


