मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उच्च न्यायालय उच्च न्यायालय चौकशी प्रकरणावरुन रात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र सीबीआयने देशमुख यांच्या जावयाचे अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकरणानंतर आता देशमुख यांना हाय कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे.
ईडी कारवाईविरोधात देशमुख यांच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर सुनावणी देण्यास नकार दिला आहे. दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागितल्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांची याचिका आता दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्यावर सीबीआय पाठोपाठ ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे.
सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळालं. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जे माजी मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं
- प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन सेनेला मराठवाड्यात आणलं- चंद्रकांत पाटील
- ‘सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा भोवला; तरुणाच्या अपघातानंतर महापालिकेला जाग’
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- नाशिक : मंदिरे उघडावीत म्हणून आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

