Share

‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान बीकेसीतील पूल दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी दिले?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बीकेसी ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून मुंबई येथे मोठी दुर्घटना झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेची त्रिसदस्यांमार्फत चौकशी करावी, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र यावरूनच भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजप युतीचे विधान केवळ बीकेसीतील एमएमआरडीए पूल कोसळण्यावरून माध्यमांचे लक्ष हटवण्यासाठी देण्यात आले होते का? असा खोचक सवाल करणारे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान काल औरंगाबाद येथे जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमीपूजन समारंभात ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले.’ असे वक्तव्य केले होते. यावरूनच राज्यात सेना-भाजप युती याबाबत चर्चा सुरु झाल्या. तर नितेश राणे यांनी हे वक्तव्य म्हणजे पूल दुर्घटनेवरून माध्यमांचे लक्ष भरकटण्यासाठी केलेला फंडा असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!