मुंबई: २०१९ लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा गुदगुल्या होत होत्या, आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत केली होती. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना खोचक सवाल केला आहे.
“देवेंद्र फडणवीस जी सांगतात ‘राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय’, म्हणजे राज ठाकरे जी पूर्वी ‘खोटं’ बोलत होते असं फडणवीसजी यांचे म्हणणे आहे का?”, असा टोला क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस जी सांगतात, "राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय"
म्हणजे राज ठाकरे जी पूर्वी 'खोटं' बोलत होते असं फडणवीस जी यांचे म्हणणे आहे का ???#DevendraFadnavis #RajThackeray
— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) April 22, 2022
नेमके काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले आहेत, अशी टीका केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की,” राज ठाकरे सत्य बोलत असल्याने त्यांचे घाव महाविकास आघाडी सरकारच्या वर्मी लागतात. भाजप सक्षम आहे .आम्ही पोलखोल यात्रा सुरू केली आहे . त्यामुळे सरकार मधील पक्ष चिंतीत आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा यांना गुदगुल्या होत होत्या, आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय.”
महत्वाच्या बातम्या:
- “…ऊर्जामंत्र्यांनी आपल्या बेजबाबदारपणाची दिलेली कबुली”, भातखळकरांची टोलेबाजी
- पर्यावरण व हवामानाचा योग्य समतोल राखून वसुंधरेला संरक्षित करण्याचा निर्धार करा- शरद पवार
- “दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही म्हणूनच…”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- IPL 2022 MI vs CSK : महेंद्रसिंह धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल..! मुंबईचा सलग सातवा पराभव
- IPL 2022 MI vs CSK : चेन्नईचा चौधरी चमकला..! मुंबईचं चेन्नईला १५६ धावांचं आव्हान