Share

“…ऊर्जामंत्र्यांनी आपल्या बेजबाबदारपणाची दिलेली कबुली”, भातखळकरांची टोलेबाजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सद्यस्थितीत १४ हजार मेगावॉटची तूट असल्याने राज्यात विजेचे भारनियमन सुरू झाले आहे. अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी गुरुवारी (२१ एप्रिल) दिली. या संदर्भात काल महत्त्वाची बैठक झाली होती. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

‘होय, राज्यात विजेचे भारनियमन सुरू झाले आहे’, अशी थेट कबुली ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी दिली. भारनियमनाची कबुली म्हणजे ऊर्जामंत्र्यांनी आपल्या बेजबाबदारपणाची दिलेली कबुली आहे. आता सवयी प्रमाणे याचे खापर केंद्राच्या मोदी सरकारवर फोडतील. महा बेजबाबदार आघाडी सरकार. असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान महावितरण कंपनीला अदानी पॉवरच्या तिरोडा प्रकल्पातून २१०० मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना १७६५ मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. तसेच केंद्रीय प्रकल्पांमधून ७६० ऐवजी ६३० मेगावॉटच वीज दिली जात आहे. त्यामुळे भारनियमन होत आहे. सोबतच महानिर्मितीला केंद्र सरकारकडून कोळसादेखील मिळत नसल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!