Share

‘देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे शेतकरी हिताचे होते ते परत एकदा जनतेसमोर आलंय’

Published On: 

मुंबई –माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन केल्या होत्या, याबाबत जलसंधारण विभागाने नुकताच अहवाल दिला असून त्यात जलयुक्त शिवार योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हणत फडणवीसांना क्लीन चीट देण्यात आलीआहे. उलट जलयुक्त शिवार योजनेमुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, आता क्लीन चीट मिळाल्यानंतर भाजपनेते चांगलेच आक्रमक झाले असून भाजपने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.

दुसऱ्या बाजूला भाजपचे माजी आमदार आणि पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील ठाकरे सरकारवर शरसंधान केले आहे. ते म्हणाले, ये पब्लिक है, सब जानती है ! जलयुक्त शिवार हे अभियान राष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले असून, यावर ज्यांनी टीका केली होती त्यांना या अहवालामुळे चपराक बसली आहे.देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे शेतकरी हिताचे होते ते परत एकदा जनतेसमोर आलंय असं त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!