Share

Chandrakant patil | “मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”; चंद्रकांत पाटलांची कबुली

Published On: 

मुंबई : पनवेलच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत असताना भाजप नेते चंद्रकांत पाटील हे असं काहीतरी बोलून गेले, ज्याची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांना घेऊन एक स्वतंत्र गट तयार केला. या गटाने भाजपशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. सगळ्यांना वाटत होत कि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार मात्र ऐन वेळेला ही घोषणा करण्यात आली कि, मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे विराजमान होतील. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. याच घटनेवर पाटील यांनी भाष्य केलं आहे.

“स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे संभाळलं. मात्र मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केला. आपल्याला या गोष्टीच दुःख झालं. परंतु हे दुःख पचवून सगळे जण हा गाडा चालवण्यासाठी पुढे आलो”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच केंद्राने जो निर्णय दिला तो देवेंद्र फडणवीस यांनी लगेच मान्य केला, त्यासाठी फडणवीसांना सलाम करूया, असे म्हणत त्यांनी उपस्थितांना उभे राहायला सांगितले.

या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजपच्या मनातील खदखद सर्वांसमोर आली. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत असून पाटलांच्या या कबुलीनाम्यावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. दरम्यान हे सर्व पाहून भाजपने त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून हा व्हिडीओ डिलीट केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!