🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. हा खटला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला असून, न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. अशातच न्यायालयामध्ये राज्यातील सत्तासंघर्षावर आज साडे दहा वाजता सुनावणी पार पडली आहे.
सर्वेच्च न्यायालयाने दिला सत्तासंघर्षावर निर्णय-
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर कोणताही निर्णय दिला नसून, येत्या 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं न्यायालकडून सांगण्यात आलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काही नेते नाराज झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे.
तसेच ही सुनावणी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ राज्याच्या पार पडली असल्याचं समजतं आहे. न्या.एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमाकोहली, न्या. पी नरसिंहा, अशी उरलेल्या चार न्यायमूर्तींची नावं आहेत.
दरम्यान, शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देऊ नये अशी याचिका दाखल करण्यात आली होती. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. आता पुढच्या सुनावणीला न्यायायलय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । “राज ठाकरे थेट वर्षावर दाखल; निमित्त बाप्पांच्या दर्शनाचे, अन्…”
- Shivsena । मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यावा ही आमची विनंती नाही तर आग्रह आहे; शिंदे गटातील आमदारच पत्र
- Shivsena । “खैरे म्हणाले राग आला तर गळा दबीन, अन् पाटील म्हणाले त्यांना… “
- Shivsena । “आदित्य ठाकरेंवर टीका केली तर गळाच दाबीन”; चंद्रकांत खैरे गुलाबराव पाटलांवर संतापले
- Uddhav Thackeray । “या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल, त्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
