नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या, कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवर चा जीएसटी माफ करा तसेच पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
सोनिया गांधी आपल्या पत्रात म्हणाल्या की, राज्यांना लस पुरवताना त्या त्या राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या आणि भविष्यातला संभाव्य ग्राफ लक्षात घेऊन पुरवठा राज्यांना करण्यात यावा. कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा. सध्या वेंटीलेटर, ऑक्सीजन सिलेंडर यासह रेमडिसिविर आणि इतर औषधांवरही जीएसटी लागू होतो. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा अशी मागणी केली आहे.
काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी हे पत्र पाठवलं आहे. बैठकीत त्यांनी राज्यातील परिस्थिती तसंच लसींची उपलब्धता, व्हेटिंलेटर आणि औषधांच्या सुविधेची माहिती घेतली होती. बैठकीत पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडने आपल्याकडे लसींचा मर्यादित साठा असल्याचं सांगत केंद्राने तो पुरवठा वाढवावा अशी मागणी केली.
महत्वाच्या बातम्या
- नंदुरबारमध्ये बिकट परिस्थिती, बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण गुजरातच्या वाटेवर
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजार रुपयांना विकताना डॉक्टरला केली पोलिसांनी अटक
- संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा


