नवी दिल्ली : दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान दिल्लीच्या सीमा बंद केल्यात. शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमा बंद झाल्याने लोकांना होणाऱ्या अडचणींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली.
नोएडातील मोनिका अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कामानिमित्त त्यांना वारंवार दिल्लीला यावे लागते. आधी ते नोएडाहून २० मिनिटात दिल्लीला यायच्या. पण शेतकरी आंदोलनामुळे गाझीपूर सीमेवर रस्ता बंद आहे. यामुळे आता त्यांना दिल्ली यायला दोन तास लागतात. हीच स्थिती सिंघू आणि टिकरी सीमेवरही आहे.
यावर न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या पीठाने सांगितले की, नागरिक अनेक दिवसांपासून रस्त्यावर बसले आहेत. एखाद्याला तेथे गाव वसवायचे असेल तर वसवा. पण दुसऱ्यांच्या आयुष्यात बाधा आणू नका. सरकारलाही याबाबत काहीतरी करायला हवे. यावर केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, वाद सोडवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. केंद्राच्या विनंतीवरून न्यायालयाने सुनावणी ७ मे पर्यंत स्थगित केली.
महत्त्वाच्या बातम्या
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

