🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना नोकरीत अडचण येवू नये यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यासाठी केंद्र व राज्य सरकारने नोकर भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी व समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
कोरोनामुळे उदभवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आज अहमदनगर दौर्यावर होते. त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्र्यांना निवेदन दिले. केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना नोकरीत अडचण येऊ नये यासाठी लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांची फी शासनाने भरावी, कोपर्डी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून न्याय द्यावा, सारथी संस्थेचे कायम स्वरुपी अस्तित्व निर्माण करावे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत आ.संग्राम जगताप, गोरख दळवी, चंद्रकांत गाडे, अॅड.शिवजीत डोके, चंद्रशेखर घुले, अभिजित खोसे, रेखा ताई जरे, बाळासाहेब पवार, दीपक लांडगे, उबेद शेख, प्रसाद डोके आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं जातं’ ; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खदखद
- कांदा निर्यात बंदी विरोधात नेवाशात काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
- राज्य वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात दमदार पाऊल टाकणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
- मी विखेंना बैठकीला बोलावतो पण ते येत नाहीत, मला त्यांच्या सल्ल्याची गरज आहे- पालकमंत्री हसन मुश्रीफ
- बालाघाट डोंगर पट्ट्यातील ढाण्या वाघाची दु:खद एक्झीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

