अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेली पाच ते सहा महिने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कांदा निर्यात बंदी धोरणाचा नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून या धोरणाचा पुनर्विचार करून ते तातडीने मागे घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कांदा निर्यात बंदीचा निर्णय त्वरित मागे घेऊन केंद्र सरकारने आपली चूक सुधारावी. कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी नाराजी तयार झाली आहे. देशातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मदतीची गरज असताना केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन कांदा निर्यात सुरू करावी अन्यथा नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी नेवासा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, उपाध्यक्ष सुनील भोगे, संघटक संदीप मोटे, राजेंद्र वाघमारे, कमलेश गायकवाड, नंदकुमार कांबळे, नंदकुमार कडू, तन्वीर शेख, जगन्नाथ कोरडे, रमेश जाधव, सचिन बोर्डे, आकाश धनवटे, शुभम वाघ, विशाल झगरे, सोपान मते, शुभम गायकवाड यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींनी बाळासाहेब ठाकरे मालमत्ता कर माफी योजनेचा लाभ घ्यावा- संग्राम जगताप
- राज्यभरात मराठा आंदोलक अक्रमक; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात निदर्शनं
- नागपुरात कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन
- शेतकर्यांवर अन्याय होणार नाही हा माझा प्रयत्न आहे, संसदेच्या अधिवेशनात विदर्भीय नेत्याचे असेही वचन
- ‘माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं जातं’ ; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खदखद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

