मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कारचालकाच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले आहेत. कारचालक वैद्यकीय सुट्टीवर असतानाही त्यांना कामावर बोलवण्यात आल्याचा दावा कारचालकाच्या कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी आता याबाबत चौकशीला सुरवात केली आहे. नारायण राणे हे लखनऊ दौऱ्यावर असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.
अशोक कुमार वर्मा असं या कारचालकाचं नाव होतं. ते राज्य स्थावर विभागत चालक या पदावर कार्यरत होते. त्यांची प्रकृती ठिक नव्हती. मात्र नारायण राणे हे लखनऊ दौऱ्यावर असताना त्यांना कामावर बोलवण्यात आलं. कामावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.
अशोक कुमार यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते वैद्यकीय रजेवर होते. पण राणे लखनऊमध्ये आल्यानंतर त्यांची रजा रद्द करण्यात आली. त्यांना जबरदस्तीने कामावर बोलवण्यात आलं. स्थावर विभागातील अधिकारी अमरिश श्रीवास्तव यांना अशोक कुमार यांच्या प्रकृतीबाबतची कल्पना होती. त्यानंतरही त्यांनी निलंबित करण्याची धमकी दिली होती. म्हणून अशोक कुमार यांना कामावर हजर व्हावं लागलं, असा गंभीर आरोप अशोक कुमार यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या लाटेतही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘या’ चार शेलेदारांनी बेळगावात फडकत ठेवला भगवा
- ‘आता मी कोणासाठी जगणार…’; सिद्धार्थच्या आईने व्यक्त केल्या वेदना
- बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

