Share

वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने हळदीच्या पिकाला नुकसान

Published On: 

हिंगोली : मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वारे तसेच अवकाळी पावसामुळे हळदीच्या पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वेळी अचानक आलेल्या पावसामुळे वाळवायला ठेवलेली हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांना खुप मोठी धावपळ करावी लागली. दरम्यान हळदीचे पीक भिजल्याने शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले.

मंगळवारी ढगाळ वातावरणासह वादळी वारे देखील वाहू लागले तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकाची काढणी देखील जोमाने सुरु आहे. वसमतसह कुरुंदा, कौठा, पार्डी, औंढा नागनाथ परिसरातमध्ये अर्धा तास पाऊस पडला, या पावसामुळे नर्सी नामदेव, दांडेगाव, पोत्रा, डिग्रस, कोंढूरसह आजुबाजुच्या परिसरात पावसाच्या सरी पडल्या. तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस देखील पडला.

या मुळे शेतातील आखाड्यावरील पत्रे उडून गेले आहेत. तर कळमनुरी तालुक्यातील घोळवा, जवळा, पांचाळ, डोंगरकडा, घोडा कामठा, सोडेगावासह परिसरात देखील खुप शेताकऱ्यांची या पावसादरम्यान धावपळ करावी लागली. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तर हळदीसह उन्हाळी भाज्यांचे देखील खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!