जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरातील नागरिक सध्या मोबाईल नेटवर्कमुळे हैराण आहेत. विविध कंपन्यांच्या सेवेत अडथळा येत असल्याने नागरिकांनी आता करावे तरी काय असा प्रश्न पडला आहे. यामुळे दोघांमधील संभाषणामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. तर अनेकांना रेंज मिळत नसल्याने ग्राहक पार वैतागुन गेले आहेत.
कुंभार पिंपळगाव येथील ग्राहकांनी विविध मोबाईल कंपन्यांच्या महागड्या प्लॅनसाठी पैसे मोजूनही जालना, बीड जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या शिवनगाव, भादली नाथनगर, नागोबाची वाडी या सर्व ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. कुंभार पिंपळगाव परिसरात अनेक खाजगी मोबाईल कंपन्यांनी टॉवर उभारलेले आहेत.
त्यामुळे या भागातील मोबाईल धारकांनी मोठ्याप्रमाणावर या कंपन्याचे प्लॅन घेतलेले आहेत. परंतु, हॅलो हॅलो करुन ग्राहक पार वैतागले आहेत. मोबाईल कंपन्या अगोदर वेगवेगळ्या ऑफर देत ग्राहकांना आकर्षित करतात. ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर महागडे रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या माथी मारतात. आता नेटवर्क नसल्याने संपर्कात व्यत्यय येत आहे. या कंपन्यांनी तात्काळ सेवा सुधारावी अन्यथा ग्राहक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी मंत्री केवळ घोषणाबाजी करण्यातच उत्साह दाखवत आहेत’
- ‘तेजस’ चित्रपटातील कंगना रनौतचा नवा लूक प्रदर्शित
- ‘या’ कारणासाठी उस्मानाबाद पालिकेने पटकावला राज्यात पहिला क्रमांक
- विलासराव देशमुख यांच्या नावाच्या प्रतीक्षेत ‘सर्वोपचार’ रुग्णालय!
- ‘तो लवंगी फटाका होता, तर तुम्ही एवढे का घाबरले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

