मुंबई : अभिनेता कमाल रशिद खान नेहमी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे तो अनेकवेळा अडचणीत देखील सापडला आहे. मध्यंतरी रशिद खान याच्यावर ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने मुंबई कोर्टात मानहानीचा दावा केला. यासंदर्भात अभिनेता कमाल रशिद खानला नोटीस पाठवण्यात आली. त्या नंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे सध्या केआरके कोणत्या न कोणत्या कारणामुळे सध्या सतत चर्चेत येत आहे.
नुकतेच त्याने कंगनाला ‘दीदी’ म्हणाल्यामुळे सोशल मीडीयावर केआरकेला ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा केआरकेने कंगना विरुद्ध एक ट्विट केलं आहे. कंगना रणौतच्या पासपोर्ट रिन्यूअल प्रकरणावरून केआरकेने यावेळी कंगनावर निशाणा साधला आहे.
https://youtu.be/-XjdMKn01yM
केआरकेने एक व्हिडीओ शेअर करत कंगना रणौतला सुनावलं आहे. केआरकेने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हीडीओ शेअर केला आहे. यात केआरकेने कंगनाचा ‘१२ वी नापास’ असा उल्लेख केलाय. एवढचं नाही तर कंगनाने द्वेष करण्यात पीएचडी केल्याचं तो म्हणालाय. तर कंगनाने काही तरी सेटिंग करत ४ राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केल्याचा आरोप देखील त्याने केला आहे.
‘कंगनाला १५ जून ते १० ऑगस्ट या काळात बूडापेस्ट आणि हंगेरीमध्ये प्रवास करायाचा आहे. ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे’. यासाठी कंगनाला प्रवास करणं गरजेच आहे. मात्र, कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याने कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यास प्राधिकरणाने नकार दिला. त्यानंतर कंगनाने पासपोर्ट रिन्यूअल करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशा पडली. न्यायालयाने कंगनाला फटकारत सुनावणी २५ जूनला पुढे ढकलली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

