Share

देवेंद्र फडणवीसांच्या ‘जलआक्रोश’ मोर्चावर सचिन सावंत यांची टीका; गुजरातचा हवाला देत म्हणाले…

Published On: 

मुंबई: महाविकास आघाडी सरकार हे पाणी विरोधी सरकार असून त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड गुंडाळली, कोकणातून मराठवाड्याला पाणी देणाऱ्या योजनेचा शासन निर्णय रद्द केला. औरंगाबादसारख्या शहरला पाणी देता आलेले नाही,  असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी औरंगाबाद येथे जलआक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले. यावरच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी टीका केली आहे.

भाजपातर्फे औरंगाबादला जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. परंतु २७ वर्षे भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये पाण्याची अवस्था या दोन व्हिडिओमध्ये दिसून येते. औरंगाबादकरांनी भाजपाचा दांभिकपणा पाहून घ्यावा. भाजपा सत्तेत आल्यावर पाणी मिळेल ही “अच्छे दिन” सारखीच घोषणा आहे स्पष्ट आहे.”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. यामध्ये गुजरातमधील पाणी प्रश्न मांडणारे व्हिडिओही सचिन सावंत यांनी पोस्ट केले आहेत. 

“जलयुक्त शिवार नावाने योजना आणून कंत्राटदारांची भर करणाऱ्यांनी करोडो रुपये लुटले. न जलस्तर वाढला ना शिवारात पाणी राहिले ना सिंचन क्षेत्र वाढले. उलट महाराष्ट्रात टँकर वाढले. गुजरातमध्ये मोदीजी सरस्वती नदीला अवतीर्ण करणार होते .नळातून पेट्रोल मिळेल म्हणत होते. आज पाणीही मिळत नाही.”, असा टोला सचिन सावंत यांनी ट्वीट करत लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!