मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांपासून ते सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारच्या डोकेदुखीत वाढ होत आहे. हे सरकार तीन भिन्न विचारांचं असून एकसूत्री नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत.
सद्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ सुरु असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत सर्वच पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण किळसवाणं झालं असून कधीही कोणताही नेता कोणाचीही भेट घेत आहे. यातून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असं टीकास्त्र देखील सोडलं आहे.
महाराष्ट्राचं किळसवाणे राजकारण बघवत नाही.
सगळेच पक्ष सकाळी एक बोलतात, तर दुपारी काहीतरी तिसरेच. संजय राऊत शिवसेनेचे नेते, पण जप शरद पवारांचा करतात. कोणी उठत कुणालाही भेटायला जात. ह्याला आपण लोकशाही म्हणणार का? लोकांचे मत गेलं चुलीत
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 29, 2021
‘महाराष्ट्राचं किळसवाणे राजकारण बघवत नाही. सगळेच पक्ष सकाळी एक बोलतात, तर दुपारी काहीतरी तिसरेच. संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत. पण जप शरद पवारांचा करतात. कोणी उठत कुणालाही भेटायला जात. ह्याला आपण लोकशाही म्हणणार का? लोकांचे मत गेलं चुलीत,’ अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आज समजले मुंबई महानगरपालिका मिठी नदी साफ का करत नव्हती’
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- फडणवीसांकडे आम्ही भविष्यातील राष्ट्रीय नेते म्हणून पाहातो; संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला
- लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय – हसन मुश्रीफ
- पवार साहेब-शाहांची भेट झाली नाही, ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे – जितेंद्र आव्हाड


