औरंंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे राज्यशासनाच्या आदेशाने जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १७९ जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संचारबंदीच्या काळात फिरणाऱ्या वाहनधारकांकडून शहर वाहतूक शाखा पोलिसांनी ६ लाख ५९ हजार ८०० रूपयांचा तर विनामास्क फिरणाऱ्या १२१ जणांकडून ६० हजार ५०० रूपये असा एकूण ७ लाख २० हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी गुरूवारी (दि.२०) कळवली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे राज्यशासनाच्या आदेशाने १४ एप्रिल पासून ते १५ मे २०२१ या काळात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या आदेशान्वये शहरात विविध ठिकाणी ५४ फिक्स पॉईन्ट लावण्यात आले आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर नाकाबंदी करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत आहेत.
पोलिसांनी अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या १७९ जणांवर विविध पोलिस ठाण्यात जवळपास ३३ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार १ हजार ६२४ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ६ लाख ५९ हजार ८०० रूपयांचा तर विनामास्क फिरणाऱ्या १२१ जणांकडून ६० हजार ५०० रूपये असा एकूण ७ लाख २० हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
- पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

