Share

‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. तौते चक्रीवादळात कोकणातील घरं, झाडं, फळबागा तसंच इतर गोष्टींचं नुकसान झालं आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील सध्या कोकण दौऱ्यावर असून नुकसानाची पाहणी करत आहेत. फडणवीस दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री कधी घऱाबाहेर पडणार अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेत.

त्यांच्या दौऱ्याचे अनेक वृत्तवाहिन्यांकडून लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. हाच मुद्दा हेरून भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. ‘फडणवीस यांनी कोकण दौरा केला, म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावे लागले’ असे वादग्रस्त वक्तव्य राणे यांनी केले आहे.

निलेश राणे म्हणाले की, ‘माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातची पाहणी करुन मदत जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत असताना कोकणासाठी मुख्यमंत्री किती मदत जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!