Share

मंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती, मात्र फडणवीस सरकारच्या तुलनेत ठाकरे सरकारच्या काळात महिला अत्याचारात घट !

Published On: 

मुंबई : धनंजय मुंडे, मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोपानंतर आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्यादृष्टीने एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण घट झाल्याच आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात फडणवीस सरकारच्या काळात २०१८ साली महिला अत्याचाराचे ३५५०१ तर २०१९ साली ३७११२ इतके गुन्हे नोंदवण्यात आलेले होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर २०२० साली मात्र महिला अत्याचाराच्या प्रमाणात १० हजारांपेक्षा जास्त संख्येने घट झाली असून महिला अत्याचाराच्या २६५८६ इतक्या गुन्ह्यांची झाली आहे.

तसेच २०१८ मध्ये बालकांवरील अत्याचाराचे १५५४४ तर २०१९ मध्ये १७५१७ गुन्हे नोंद झाले होते. २०२० साली मात्र बालकांवरील अत्याचाराचे हे प्रमाण तब्बल ६ हजारांनी घटून बालकांवरील अत्याचाराच्या १११५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचा वाढता आलेख महाविकास आघाडी सरकारच्या काळात हजारोंच्या संख्येने घटल्याची बाब यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या आधारावर आर्थिक पाहणी अहवालात ही आकडेवारी सादर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!