🕒 1 min read
मुंबई : महागाई भत्त्यात वाढ आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आला आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. परंतु न्यायालयाने मनाई करून देखील राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील विरोधी पक्षही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले असून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.
यावेळी बोलत असतांना पडळकर म्हणाले की,’गेल्या काही दिवसांमध्ये ३१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील तीन जणांचे प्राण वाचले आहेत. तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही. त्याच्या दारात जाऊन अश्रू पुसणे सोडा किमान दोन ओळींचे सांत्वन पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवले नाही. मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि तो संकटात आल्यावर त्याला उघड्यावर सोडायचे हाच यांचा मराठी बाणा आहे. या ठाकरे सरकारच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांना उघड्यावर आणायचे असेल तर मी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो येतो १० नोव्हेंबरला मुलाबाळांसह मंत्रालयाच्या आवारात संसार मांडू. हे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने लढू आणि जिंकू सुद्धा. या आंदोलनात कुठल्याही प्रकारचे गालबोट नये याची काळजी घ्यायची आहे. आता एकच निर्धार मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, एसटीत एकूण २३ कामगार संघटना असून, विविध मागण्यांसाठी त्यांची कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी २७ ऑक्टोबरला बेमुदत उपोषण सुरू केल्यावर २८ ऑक्टो.ला हा संप सुरू झाला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता मिळाल्यानंतर तसेच राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळ विलीनीकरण, वार्षिक वेतनवाढ या मागण्यांवर दिवाळीनंतर चर्चेचे आश्वासन एसटी महामंडळाने दिल्यानंतरही संप सुरूच राहिला. कृती समितीतील २३ कामगार संघटनांनी विलीनीकरणाची मागणी उचलून धरली. पण, त्यापैकी २१ संघटना संपात सहभागी झाल्या नाहीत. संघर्ष एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी ३ नोव्हें.च्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याची नोटीस दिली. परंतु संप पुकारण्यास न्यायालयाने मनाई केल्यानंतरही देखील आंदोलन सुरूच राहिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…’, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- इंधनदर कपातीवरून शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- ‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय’, नारायण राणेंचा हल्लाबोल
- ‘शिवसेनेनं एक निवडणूक काय जिंकली, लगेच पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहायला लागलीय
- त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत- प्रसाद लाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
