औरंगाबाद: शासन निर्देशानुसार महापालिकेच्या नागरिक मित्र पथकांकरवी शहरात विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार या पथकांनी १ एप्रिल २०२० ते २८जानेवारी २०२१ या कालावधीत विनामास्क वावरणार्या १५,३८९ नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रूपयेप्रमाणे ७६ लाख ९४ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
पालिका आयुक्त पांडेय यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विनामास्क फिरणार्या नागरिकांवर नित्याने नागरिक मित्र पथकांकडून कारवाई केली जात आहे. यासोबतच रस्त्यांवर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे यासाठी देखील पथकांडून दंड आकारला जात आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख जाधव यांच्या नेतृत्वात या पथकांनी आजवर विनामास्क वावरणार्या १५,३८९ नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रूपयेप्रमाणे ७६ लाख ९४ हजार ५०० दंड रूपयांचा दंड वसूल केला आहे.
प्लास्टिकचा वापर, पाच हजारांचा दंड
शहरातील विविध ठिकाणी फळ,भाजी व इतर किरकोळ विक्रेत्यांकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याबद्दल ५००० रुपये दंड वसूल करण्यात आला. विविध ठिकाणी जास्त कचरा आढळून आल्याबद्दल १४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. याप्रमाणे दिवसभरात एकूण 29,३०० रुपयांचा दंड वसूल केल्याचे पालिकेने कळवले.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेकिंग न्यूज : संजय राऊत आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता
- निवडणूक बिनविरोध करत ‘वृद्धेश्वर’ सहकारी कारखान्यावर पुन्हा राजळेंची सत्ता
- स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसराचे रुपडेच पालटले
- खासदारांनी आकडे मोड नीट करावी – राजू तनवाणी
- उस्मानाबादचे व्यापारी जीएसटी विरोधात आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

