वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करुन उद्यापासून संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनात वर्धा लोकसभा मतदार संघातील प्रमुख विषय मार्गी लावण्याकरिता आपले प्रयत्न असतील. मतदार संघाला न्याय मिळवून देण्याकरिता आपले प्रयत्न असतील अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष मतदारांमध्ये न जाता पत्रक काढून त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
अधिवेशन काळात दिल्ली येथे राहणे सर्व खासदारांना बंधनकारक असुन आपल्या मतदार संघातील जास्तीत जास्त विषय मांडण्यासाठी तसेच आपल्या भागातील समस्या संबंधीत केन्द्रीय मंत्र्यांपर्यत पोहचून समस्यांवर तोडगा निघेल अशी अपेक्षा खा. तडस यांनी व्यक्त केली.
आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे व संपुर्ण सत्रात सहभागी होता येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मास्क, विषाणूनाषक, सामाजिक दुरावा या तीनही गोष्टीचा नागरिकांनी प्रभावी पणे वापर करावा व आपली काळजी घ्यावी असे आवाहन खा. तडस यांनी केले.
महत्वाच्या बातम्या:-
- काय सांगता, दोन दिवासांत अधिकाऱ्यांनी केले गडकरींनी सांगितलेले ‘हे’ काम
- ‘कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच’ प्रताप सरनाईकांचा भाजपला टोला
- श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह ईतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात- प्रकाश आंबेडकर
- कंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या – अमोल मिटकरी
- गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं – आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

